...असेही मावळे शिवरायांचे! 'दृष्टी नाही पण इच्छाशक्ती' याच जोरावर ‘त्या’ 48 साहसवीरांनी सर केला पुंरदर किल्ला
महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या डोंगररांगांचे सौंदर्य आणि येथील शिखरे, किल्ले जगभरातील पर्यटकांसह देशातील, महाराष्ट्रातील तरुणांना नेहमीच पर्यटनासाठी, ट्रेकिंगसाठी आकर्षित करीत असतात. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गड-किल्ल्यांची सफर म्हणजे आनंदाची पर्वणीच असते. प्रत्येक ऋतूमध्ये किल्ल्याचे सौंदर्य वेगवेगळे असते. मात्र नेत्रहिनांना त्याचा लाभ घेता येत नाही.
Diksha Patil
| Jan 27, 2025, 16:26 PM IST
1/7

अंध व्यक्तींची ही खंत लक्षात घेऊन मुंबईतील रुईया महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांनी सुरु केलेली 'नयन फाउंडेशन' ही संस्था गेली 15 वर्षे अंध मुला-मुलींना 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने गड-किल्ल्यांची सफर घडवून आणत आहेत. आतापर्यंत या संस्थेच्या मदतीने अंध बांधवांनी रायगड, सिंहगड, राजगड, रायरेश्वर, सज्जनगड, शिवनेरी, तोरणा, प्रतापगड आणि महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर असलेले कळसूबाई सर केले आहे. यंदा त्यांनी 48 अंध बांधवांना पुरंदर किल्ल्याची सफर घडवून आणली आहे.
2/7

3/7

4/7

वाटा-आडवाटांवरील घसरणे-पडणे-सावरणे सुरू झाले. खड्डे, चढउतार यांचा अंदाज घेत पावले टाकली जात होती. बरोबरच्या मदतनिसांकडून प्रत्येक पावलाबाबत मार्गदर्शन केले जात होते. अशी ही दमछाक करणारी, आव्हान वाटणारी दृष्टिहीन गिर्यारोहकांची मोहीम हळूहळू गडाच्या माथ्याच्या दिशेने सरकू लागली. डोळयांसमोर केवळ अंधार आणि आधारासाठी केवळ एक हात यावर या 48 पायांनी केवळ अडीच तासांमध्ये त्यांनी 4470 फूट उंचीच्या दुर्गशिखराच्या माथ्याला स्पर्श केला आणि आगळ्यावेगळ्या पद्धतीनं प्रजासत्ताकदिन साजरा केला.
5/7

हा ध्यास आहे मुंबईतील ‘नयन फाऊंडेशन’च्या दृष्टिहीन युवकांचा आणि त्यांना मदतीचे हात देणाऱ्या ‘गिरिप्रेमी’च्या गिर्यारोहकांचा आणि स्वरुप सेवा संस्थेचा. गडात प्रवेश करताच छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या जयजयकाराच्या घोषणा झाल्या. मग तिथल्या चिऱ्यांना स्पर्श करत, गडाचा इतिहास उलगडू लागला.
6/7
