जम्मू-काश्मीर : अमरनाथ यात्रेनंतर भाजप सरकार बनविण्याचा प्रयत्न करेल, राज्यपाल बदलणार - सूत्र

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा सत्ता स्थापन करण्यासाठी हालचाली सुरु होण्याची शक्यता आहे. पीडीपीचा भाजपने पाठिंबा काढून घेतल्यानंतर पीडीपी-भाजप युतीचे सरकार कोसळले. दरम्यान, सरकार स्थापन करण्यासाठी कोणत्याही राजकीय पक्षाने पुढाकार न घेतल्याने येथे राज्यपाल राजवट लागू करण्यात आली आहे. दरम्यान, आता हाती आलेल्या वृत्तानुसार भाजप पुन्हा एकदा सत्ता स्थापन करण्याची शक्यता आहे. भाजपने बंडखोर आमदारांना गळाला लावण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. दरम्यान, येथील राज्यपाल बदलून पुन्हा भाजप,पीडीपी आणि अपक्ष आमदारांच्या माध्यमातून सरकार स्थापन करण्याची शक्यता आहे. अमरनाथ यात्रेनंतर सरकार स्थापन करण्यासाठी प्रयत्न सुरु होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केलेय.

भाजप नेते राम माधव यांनी जम्मू-काश्मीरमधील युतीच्या सरकारचा भाजपने पाठिंबा काढून घेतल्याचे पत्रकार परिषदेत जाहीर केले. ज्या उद्देशाने पाठिंबा दिला होता. त्याचा उद्देश पूर्ण न झाल्याने भाजपने पाठिंबा काढत असल्याचे राम माधव यांनी स्पष्ट केले. जम्मू-काश्मीर खोऱ्यामध्ये दहशतवादी कारवाया वाढल्या होत्या. काश्मीरमध्ये लोकांना त्रास दिला जात आहे, असे यावेळी भाजपने म्हटले.

भाजप प्रयत्न करु शकतो

जम्मू काश्मिरमध्ये राज्यपाल राजवट आहे. परंतु लोकशाही पद्धतीने सरकार स्थापन करण्याची शक्यता संपलेली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप अमरनाथ यात्रा संपण्याची प्रतीक्षा करीत आहे. अमरनाथ यात्रा २६ ऑगस्ट रोजी संपत आहे. भाजपच्या सूत्रांच्या मते, भाजप लवकरच लवकरच जम्मू-काश्मीरमध्ये सरकार बनविण्याचा प्रयत्न करेल. जरी भाजपकडे अद्याप संख्या नसली तरी सूत्रांनी सांगितले की, भाजप लवकरच बहुमतासाठी प्रयत्न करु शकेल.

त्यामुळे भाजपचे सर्वसाधारण मत

भाजपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडीपीवर नाराज असलेले माजी अर्थमंत्री हसीब द्राबूसह अनेक आमदार भाजपच्या नेत्यांच्या संपर्कात आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे एक डझन पीडीपी आमदारांनी भाजपने सरकार स्थापन करावे, अशी इच्छा  व्यक्त केली आहे. याशिवाय जम्मू-काश्मीरचे काही आमदारही भाजपच्या सहकार्याने सरकार स्थापन करण्याच्या बाजूने आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाच अपक्ष आणि तीन काँग्रेसचे आमदार भाजपच्या संपर्कात आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये बहुसंख्य ४४ आमदारांना आवश्यक असण्याची गरज आहे. भाजपचे २५आमदार आहेत. अशा परिस्थितीत भाजपला बहुमत मिळेल आणि १९ आमदारांची आवश्यकता आहे. तथापि, भाजपने सरकार स्थापन करण्याचा दावा करेल त्यावेळी त्यांच्याकडे बहुमतापेक्षा जास्त आमदार असणे आवश्यक आहे.

भाजपचा पुढचा मुख्यमंत्री हिंदू?

जम्मू-काश्मीरमधील काही कार्यकर्ते मुख्यमंत्री बनतील, असे भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वप्न आहे. त्यामुळे जम्मू-काश्मीरमध्ये पुढचा मुख्यमंत्री हिंदू असेल, असे संकेत मिळत आहे. भाजपचे सर्व आमदार जम्मू विभागातील आहेत आणि ते सर्व राज्यातील अल्पसंख्यक आहेत, जे हिंदू आहेत. अशा परिस्थितीत, जर भाजपच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले तर मुख्यमंत्री हिंदू होईल. हे स्वप्न अनेक वर्षांपासून संघाकडून पाहिले जात आहे.

मिशन २०१९ साठी ही पायरी महत्वाची

भाजपच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हिंदू मुख्यमंत्री झाले तर भाजपला लोकसभा निवडणुकीत याचा फायदा मिळेल. जम्मू-काश्मीरमधील ६ लोकसभा मतदारसंघांपैकी भाजप आणि एनडीएमध्ये सध्या ३ खासदार आहेत. सध्या २०१९ मध्ये भाजपाला दोन जागा गमावण्याची स्थिती आहे. म्हणूनच, सरकार बनवून पुन्हा भाजपचा जनाधार मिळविण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. पीडीपीचे सरकार स्थापन करून जम्मू आणि लडाख भागाचा विकास झालेला नाही. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये संताप आहे. पण आता जर भाजपचा मुख्यमंत्री बनले तर मग जम्मू आणि लडाख भागावर लक्ष केंद्रित केले जाईल. याशिवाय राज्याच्या राज्यपालाची जागा घेतली जाईल. कोणतीही राजकीय व्यक्ती गव्हर्नर बनू शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिन्याच्या अखेरीस नव्या राज्यपालाची नियुक्ती केली जाऊ शकते.

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
bjp-to-attempt-govt-formation-in-kashmir-after-amarnath-yatra
News Source: 
Home Title: 

जम्मू-काश्मीर : अमरनाथ यात्रेनंतर भाजप सरकार बनविण्याचा प्रयत्न करेल, राज्यपाल बदलणार - सूत्र 

जम्मू-काश्मीर : अमरनाथ यात्रेनंतर भाजप सरकार बनविण्याचा प्रयत्न करेल, राज्यपाल बदलणार - सूत्र
Yes
No
Section: 
Facebook Instant Article: 
Yes
Authored By: 
Surendra Gangan
Mobile Title: 
जम्मू-काश्मीर : अमरनाथ यात्रेनंतर भाजप सरकार बनविण्याचा प्रयत्न करेल